Na
About book : ‘ करंडा आणि रूपांतरण ’ हे पुस्तक माझ्या सारख्या गॄहीणीच्या जिवंत अनुभवांचा निचोड आहे. संसार कसा फुलवावा आणि हे चालू असतांनाच जीवनात अध्यात्माच बीज कसे पेरावे? आणि ते अंकुरित होतानाची आपली मनस्थिती, आनंदाच्या अनुभूतीला कशी गवसणी घालते हे अनुभवायचं असेल तर हे पुस्तक आपल्यासाठीच आहे. ह्या पुस्तकातील रचना कवयित्रीच्या हृदयातील सुकोमल भावनांचे उमटलेले प्रतिबिंब आहे. कधी आपल्या प्रिय व्यक्ती विषयीच्या प्रेमासाठी विणलेला सुंदर शेला आहे, कधी गोड रागावणं आहे तर कधी वस्तूस्थितीची जाणीव करून देणे आहे. कधी विरहाच्या झळांची धगधगती आग आहे तर कधी प्रेमाला मुक्त सोडून देणे आहे. आपल्याच विश्वात रममाण होतांना समाजातील घडामोडींवर ही त्यांचे लक्ष आहे. ज्याला प्रेम करता येतं आणि ज्याच्या स्वभावात प्रेमाला अत्यंतिक महत्त्व आहे अशा जीवांसाठी यातील रचना मन मोहून घेतात. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे त्यामुळे बदलणाऱ्या मन: स्थिती बरोबर विचारांमध्ये बदल होणं स्वाभाविक आहे. तशा यातील रचनेत बदल होत होत त्यांचे स्वरूप बदलू लागले. विचारत परिवर्तन घडवून आले की मन रूपांतरित व्हायला लागते, कालचे अनुभव आपल्याला आजच्यासाठी मजबूती देतात. जसे माती, खत, व पाणी घालून , गुलाबाच्या रोपट्याच झाडात रूपांतर होऊन
About author : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता गावी , कवयित्रीचा, शेतकरी कुटुंबात २१ जुलै १९६५ रोजी जन्म झाला. शालेय शिक्षण गावात पूर्ण करून लोणी – प्रवरा येथे डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज मध्ये कॉमर्स ची डिग्री प्राप्त केली. १९८५ साली लग्न झाले. काही कालावधीनंतर, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, १९९५ साली अहमदनगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये, एम. ए. ( मराठी) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान कविता वाचनाची व लेखनाची गोडी लागली. त्यातूनच पुढे, अनेक विषयांवर कविता लिहिल्या गेल्या. अनेक साप्ताहिकातून व मासिकातून कविता प्रसिद्ध झाल्या. तसेच अहमदनगर व पुणे येथील आकाशवाणी केंद्रावर कविता वाचनाचे कार्यक्रम झाले. साल २००० दरम्यान, गुरूकॄपेने लिखाणाच्या स्वरूपात बदल होऊ लागला. आध्यात्मिक लिखाणात मन रमू लागले त्यातून अनेक हिंदी व मराठी भजने लिहून झाली. त्यातूनच “ सद्गुरूसा ना कोई जगतमें “ व “ वचनलीलामॄत “ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली. २००० पूर्वी लिहिलेल्या “माहेरचा आहेर,” व “करंडा आणि रूपांतरण” या कविता संग्रहाला पुस्तक स्वरूपात वाचकांच्या हाती सोपवत आहे. “गुरू कॄपेची सरिता” या माझ्या यू ट्यूब चॅनल वर वचनायण भाग १ ते ९ , पौर्णिमा दर्शन, प्रपंचातून परमार्थ या वचनायणच्या सत्संग सेरिज आणि आत्म निवेदन भक्तीवरील कविता ऑडिओ रूपात उपलब्ध आहेत.