ISBN : 978-81-19084-24-1
Category : Fiction
Catalogue : Poetry
ID : SB20461
Paperback
200.00
e Book
125.00
Pages : 123
Language : Marathi
आत्मजयी आत्मजयी हा हिंदी साहित्य जगतातील महान साहित्यिक कुंवर नारायण यांच्या 'आत्मजयी' नावाच्या महाकाव्यसदृश कवितांचा अनुवाद आहे. कठोपनिषदातील नचिकेता या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित ही साहित्यकृती आहे. कुंवर नारायण ज्ञानपीठ पारितोषक विजेते, पद्मभूषण उपाधी विभूषित आणि अनेक सन्माननीय उपाधींनी सन्मानित झालेले श्रेष्ठ साहित्यिक आहेत. आत्मजयी, जीवन आणि मृत्यू , पिता आणि पुत्र , परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील आध्यात्मिक संवाद आहे. आत्मजयी म्हणजे स्वतःला जिंकणारा. कठोपनिषदातील वाजश्रेयस ऋषी एका महायज्ञात आपले सर्व ऐहिक वैभव दान करायचे योजतात . मात्र त्यांच्या पुत्राला त्यांचे हे दान दांभिक वाटते कारण ते अशा अनेक ऐहिक वस्तूंचे दान करतात की ज्या निरुपयोगी आणि मूल्यहीन झाल्या आहेत. त्यांनी दान केलेल्या गायी वृद्ध आणि भाकड झालेल्या असतात. अशा दानामुळे चिंताचुर झालेला त्यांचा पुत्र नचिकेता त्यांना आपली शंका व्यक्त करीत म्हणतो “ प्रिय पिताजी , आपण माझे दान कोणाला देणार? ” संतप्त झालेले पिताजी त्यावर उत्तर देतात “ तुझे दान मी मृत्यूला करणार आहे.” नचिकेत हे मान्य करून मृत्यूकडे म्हणजे यमदेवाकडे जातो. त्यावेळी यमदेव घरी नसल्याने नचिकेता त्यांच्या दाराशी तीन दिवस अन्न पाण्याशिवाय उपाशी बसून राहतो. यमदेव घरी परतल्यावर आपल्या अतिथीला असे उपोषित बसावे लागल्याने अत्यंत दुःखी होतात आणि आपल्या अतिथीची क्षमा मागतात आणि त्याची भरपाई म्हणून अतिथीला तीन वर मागायला सांगतात. नचिकेताने यमदेवाकडे मागितलेल्या तीन वरांपैकी पहिले दोन वर यमदेव त्याला देतात. परंतु तिसरा वर देण्यास ते तयार होत नाहीत कारण तिसऱ्या वराने नचिकेत त्यांना म्हणतो की मानवाच्या मनाच्या आकलना पलीकडे असलेले आत्म्याचे ज्ञान मला द्या आणि तसेच मृत्यूनंतर मानवाचे काय होते ते मला सांगा. अर्थातच यमदेव हे मान्य करीत नाहीत. ते नचिकेतला म्हणतात " हे मान्य करणे मला शक्य नाही. त्याच्या बदल्यात जगातील सर्व ऐहिक वैभव वा तू जे काही अन्य मागशील ते देण्यास मी तयार आहे." मात्र नचिकेत आपल्या मागणीबाबत ठाम असतो.अखेर यमदेवाला त्याची मागणी पूर्ण करावी लागते. आत्मजयी हे आध्यात्मिक काव्य यमदेव आणि नचिकेत या दोघांमधील अध्यात्मिक सवांद आहे त्या मुळे हे काव्य अत्यंत रसपूर्ण, मनोवेधक आणि वाचनीय झाले आहे.